Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

उर्दू भाषा/लिपी,देवनागरी हिंदी व दुष्यंत कुमार-Sadanand Dabir

 उर्दू भाषा/लिपी,देवनागरी हिंदी व दुष्यंत कुमार

उर्दू भाषा/लिपी,देवनागरी हिंदी व दुष्यंत कुमार
सदानंद डबीर


1. दुष्यंत कुमार ह्या हिंदी कवीचे नाव,मराठी गजलकार कवींना माहिती असतेच.त्यांच्या नावावर अनेक कविता संग्रह व गद्य साहित्यसंपदा आहे.मात्र गजल संग्रह एकमेव आहे.तो म्हणजे साये में धूप.केवळ 52गजला त्यात आहेत.त्यांच्या आधीही हिंदीत गजल होती.पण जशी मराठीत ख-या अर्थाने,सुरेश भटांपासून गजल आली,तेच स्थान हिंदीत दुष्यंतकुमार ह्यांचे आहे.अटल बिहारी वाजपेयींपासून आजच्या अनेक पुढा-यांपर्यत,दुष्यंत कुमारांचे शेर आपल्या भाषणात कोट करत असतात.साये में धूप गजल संग्रह 1975 साली प्रकाशित झाला,आज त्याची किमान पस्तीसावी आवृत्ती,बाजारात असावी.

उर्दू शब्द, (देवनागरी) हिंदीत लिहिताना त्यांनी काय भूमिका घेतली होती,हे जाणून घेणे आपल्याही दृष्टीने  महत्वाचे आहे.

2.संग्रहाला,दुष्यंत कुमारांनी  मनोगत लिहिले आहे.ते पुढील प्रमाणे. 

मैं स्वीकार करता हूँ...कि,ग़ज़लों को भूमिका की जरूरत नहीं होनी चाहिए,लेकिन एक कैफियत इनकी भाषा के बारे में जरूरी है|कुछ उर्दू-दाँ दोस्तों ने कुछ उर्दू शब्दों के प्रयोग पर एतराज किया है| उनका कहना है कि शब्द 'शहर' नही 'शह्र' होता है,'वजन' नहीं 'वज्न'होता है|

     -कि मैं उर्दू नहीं जानता,लेकिन इन शब्दों काप्रयोग यहाँ अज्ञानतावश नहीं, जानबूझ कर किया गया है| यह कोई मुश्किल काम नहीं था कि शहर की जगह 'नगर' लिख कर इस दोष से मुक्ति पा लूँ किंतु मैंने उर्दू शब्दों को उस रूप इस्तमाल किया है,जिस रूप में वे हिंदी में घुल-मिल गये है| उर्दू का 'शह्र' हिंदी में 'शहर' लिखा और बोला जाता है, ठीक उसी तरह जैसे हिंदी का 'ब्राह्मण' उर्दू में 'बिरहमन' हो गया है और 'ऋतु' 'रुत' हो गयी है|

पुढे दुष्यंत कुमार लिहितात---

कि उर्दू और हिंदी  अपने-अपने सिंहासन से उतरकर जब आम आदमी के पास आती है तो फर्क कर पाना बडा मुश्किल होता है| मेरी नीयत और कोशिष यह रही है कि इन दोनों भाषाओं को ज्यादा से ज्यादा करीब ला सकूँ| इसलिए  यें गजलें उस भाषा में कहगयीहै,जिसे मैं बोलता हूँ|


3.हे सर्व सांगण्याचे कारण असे की,उर्दू शब्द आम्ही घेतला तरी त्याच्या छंदाचे,लेखनाचे व व्याकरणाचे नियम आमच्या भाषेचेच लागतील.

तेच दुष्यंत कुमार सांगत आहेत.उर्दू शब्द  शह्र

असा असून दोन मात्रांचाच आहे तो तसाच घ्या किंवा नगर शब्द वापरा,हा आग्रह  चुकीचा आहे. 

तसा ग़ज़ल  शब्द उर्दूत "ल,गा" वजनाचा आहे तसाच घ्या कारण त्यांच्या छंद शास्त्राचा तसा नियम आहे,हा आग्रहही चुकीचा म्हणावा लागेल.

4.म्हणून माझे प्रतिपादन असे की,दोन ओळींचा शेर,जी दोन ओळींची संपूर्ण,स्वयंपूर्ण व स्वायत्त कविता आहे(सुरेशभट),तो गजलचा आत्मा आहे.

चांगला शेर अशी काय जादू करतो की एकदा ऐकताच तो आयुष्यभर तुम्हाला स्मरणात राहतो.ते शेराचे गारूड आणि गजलचा आकृतीबंध ज्यात काफिया,रदीफ,बहर हे घटक आलेत तेवढेच घ्यावेत.गजलचे जुजबी नियम घ्यावेत आणि मराठी गजल लिहावी.मराठीत गजलीयत कशी आणता येईल हा कळीचा प्रश्न आहे. 

    आपण नेमका हाच मुद्दा सोडून उर्दू गजलचे बारीकसारीक नियम,आणि तंत्र ह्यांचा काथ्याकूट करण्यात दंग आहोत.परिणाम स्वरूप गजलचा एक तंत्रशुध्द सांगाडा आम्ही आयात करत आहोत.शेर/शेरीयत,गजल/गजलीयत...निसटून जातेय.अर्थात परिस्थिती इतकी वाईटही नाही.चांगली दर्जेदार मराठी गजल व शेर लिहिले जात आहेत.

जरी आज त्यांचे प्रमाण कमी असले तरी.आणि कुठल्याही भाषेत कुठल्याही वाङमय प्रकारात असेच होत असते.दर्जेदार कलाकृती संख्येने अल्पच असतात.

मित्र हो,दुष्यंत कुमारांचा विषय निघालाच आहे,तर मी एक नमूद करू इच्छितो की

साये में धूप ह्या गजलसंग्रहाचा सावलीतली उन्हे ह्या शीर्षका अंतर्गत मी भावानुवाद केला होता आणि ह्या गजला मराठी गजलच्या आकृतीबंधात आणल्या होत्या.डिसें. 2005 ला ग्रंथालीने हे पुस्तक प्रकाशित केले.त्याची सर्वदूर दखल घेतली गेली. हिंदी गजल विश्वानेही दखल घेतली व हिंदीचे ख्यातनाम लेखक संपादक श्री.कमलेश्वर ह्यांनीही दखल घेऊन मला प्रशंसापर पत्र लिहिले होते....असो.

त्या भावानुवादाची झलक प्रस्तुत करतो.

१.ये सारा जिस्म झुककर बोझसे दुहरा हुआ होगा,

मैं सजदे में नहीं था आपको धोखा हुआ होगा|


ओझ्याने हे शरीर माझे असेल झुकले,

सलाम नव्हता...तुला उगाचच तसे वाटले!

२. अपाहिज व्यथा को वहन कर रहा हूँ

     तुम्हारी कहन थी कहन कर रहा हूँ

                    ○○○○

     अँधेरे में कुछ जिन्दगी होम कर दी

      उजाले में अब ये हवन कर रहा हूँ


व्यथा पांगळी ही अशी वाहतो मी

कहाणी तुझी ह्या जगा सांगतो मी


तमाच्या तटी मी जिणे जाळलेले

उजेडात समिधा अता टाकतो मी.

३. भूख है तो सब्र कर,रोटी नहीं तो क्या हुआ

     आजकल दिल्ली में है जेरे बहस है ये मुद्दआ


भूक लागली,रोटी नाही?...नसेल सुद्धा

दिल्लीमध्ये, ऐरणीवरी आहे मुद्दा!

४.अब किसी को भी नजर आती नहीं कोई दरार

घर की हर दीवार पे चिपके है इतने इश्तहार


गेलेले हे तडे घराला,कोणालाही मुळी न दिसती

जाहिराति एवढ्या डकवल्या,प्रत्येकच या

भिंतीवरती

५. तुम्हारे पाँवों के नीचे कोई जमीन नहीं,

     कमाल ये है कि फिर भी तुम्हे यकीन नहीं


तुमच्या पायाखाली कुठली जमीन नाही

कमाल आहे तरी तुम्हाला यकीन नाही!

.                    सदानंद डबीर 9819178420

Post a Comment

0 Comments